Wednesday, 29 July 2009

बऱ्याच दिवसांनी काहीतरी

मध्ये खूप दिवस झाले काही लिहिलं नव्हत म्हणून आज वेळ आहे तर लिहित आहे
गेल्या आठवड्यात श्री राज ठाकरे यांच्या म.न .से. कार्यकर्त्यांचा एक अजब प्रकार नजरेत पडला
आता तो माणूस म.न.से चा कार्यकर्ता होता का नाही ते माहित नाही पण मला जे खटकल ते लिहित आहे

मी गेल्या आठवड्यात मुंबई सेन्ट्रल पासून taxi पकडली दादर ला यायला आणि सेना भवन पाशी signal ला एक motor cycle वाला आमच्या मध्ये आला
आमच्या taxi driver ची काहीच चूक नव्हती तो बरोबर signal ला थांबला होता . तो motor cycle वाला आम्हाला उगाचच शिव्या द्यायला लागला कि सिग्नल ला लाने तोडून कशाला येत वगैरे
खरा सांगायचा तर आमचा taxi driver बरोबर जात होता आणि त्या दुसर्या माणसानेच पहिल्यांदा शिव्या द्यायला सुरुवात केली .
नंतर पुढच्या सिग्नल ला तो गाडी बाजूला लावून taxi driver चा गळा पकडायला आला आणि म्हणाला

"तुझ्या आईच्या तर ..... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला शिव्या देतोस ........ चल बाहेर ये "

आता खरा तर तोच शिव्या देत होता आणि आम्हाला म्हणत होता कि शिव्या देऊ नकोस करून
माझा तर मत पडत कि तो कार्यकर्ताच नसावा कारण मी स्वतः राज ठाकरे यांचा fan आहे आणि त्यांनी अश्या माणसांना थारा देलेला नाही
मग दुसरी माणस अस करून म.न.से. च नाव कशाला खराब करतात काही समजत नाही .

जाऊदे.
नंतर परत वेळ मिळाला कि परत काहीतरी नवीन लिहीन

Friday, 6 June 2008

mumbai rain and the people

couple of days ago there is an official start of the rainy season in mumbai city as usual the at the first time there is delay at the central railway locals just with the rain of 5-10 mins
i think it is not a new thing to comman person in mumbai.
The event i want to describe is the nature of the people i came across in these two days
as usual i left for the day from office late in the evening by the time there is a huge rain outside so i wait outside till the rain stops or become somewhat slower with my friend.
Somehow catch the bus to the station as we dont have an umbrella, the bus as usual is full packed and we somehow managed to get in
the gents passengers in the bus are some what sensible than the ladies passengers and comparatively more cooperative.
I dont want to go in deep of that as it will be a whole chapter, so skipping that for next section and now descibing the event in the local train.
The usual train at 7.47pm from dadar is announced late for that day so there is a huge crowd at the station so i decided to go to earlier station to catch a fast train ie at Byculla.
I got the same by luck and managed to get inside that one with some ease. I know that if i m inside the compartment then somehow i will get the seat some time later at Thane or may be at Dombivali coz the general practice of dombivali people is that they will not left the seat till dombivali.
So hoping for to get the seat the thane crossed and i m in a place of "regular group" people at train looking at each others place that someone who will give us the seat.
There was no one to left the same so we are helpless standing along one side.
Thank god one older man got petty on us and just left that seat and offer that to me.
actually he himself got the seat at thane and still offering us at dombivali, hardly 10-15 mins distance then also.
I remember his sentence that everybody should get a chance to seat. The one which may not applicable to the group members of certain kind.
We also have a group of around 15 people in the morning but there is equality whenever a new member comes to our group. We dont treat him the way as i was treated that evening.

Tuesday, 13 May 2008

Public events ...think again

i just want to discuss the many kinds of people that i came across, the various evidents show the nature of the people.
Yesterday only there was Shivjayanti and every where there is mood of celebration.
The reason is obvious that there is Birthday of the Great Maharashtrian emperor, upto this point it is ok but in city Ambarnath there is mood of some extra celebration.
The station area is surrounded by flags and all decorations, there is a place reserved for the some events outside the road.
I reach late in the night and saw some heavy loudspeakers with songs are played in the public area, it was difficult to bear the sound. If people want to celebrate the day then it is ok but do some useful things na. Help some organizations, or poor people those need help. What they people goin to achieve with these loud sound and unnecessary things. let it be ..........
Another event i wnt to mention is daily local train experince
i travel daily by 7.37 train from ABR, there is general tendency of the UNR people to come back seated while train came down from UNR, upto some extent it is ok coz every one wnt a seat while travelling so long, but bcoz of the limited seats everyone dont get chance to sit. It is understood and in the half way the people let others sit and they stand up the other half.
This continues in all the trains generally, but there are some peoples that dont think of others and remain seated for the entire journey. This should not happen dont know the reason why people used to do this ............
A strange experience about one frnd (say frnd "x" coz she dont want her name to display on net) in couple of weeks back i want to mention here.......
We meet on orkut for the first time, though we were in same school but we havent talked ever.
while surfing i just got her profile and sent scrap for friendship, she accepted it and since then we used to chat daily.
once while chatting the topic discussed was lets meet someday and we meet
I have planned what topics to discuss and where to go but the actual things happened was totally unexpected and we just keep standing by roadside and just discuss unnecessary things, they are necessary for priliminary information but ok for that day.
After that we used to meet every day for atleast half an hour and chat by side of the road.
Meanwhile "x" told me that she told Frnd Y(our frnd) abt our visit (Y was also with us in the school)
Y asked her to think for a while when talking to me. I think she was right.
From that day there is sudden change in"X" and the meetings were less frequent, the reason told to me that she getting embarrased while talking to me by roadside, which is true to me also and the passing people looking around at us in strange manner.
I got the reason and said nothing coz she is right.
But i cant get the things and wnt someone to discuss the things that i experience and dont get.
Past days i discussed many things with "X" and got a good relief, though the solutions she suggested was not 100% acceptable.
I suggested many ways to meet so that others who know us dont see us while chatting on road
I told her that may we can meet at earlier stations and chat so that itwill be fine for both of us
She suggested that we can meet at VT which in opposite direction to my way back to home so i refused, then i suggested that we can meet at any station on the way back to home so that it will be easier for both of us
She refused to accept, the reason she gave was not at all acceptable according to my point of view.
Let it be ........ we now only chat in gmail and if necessary meet for 5-10 mins
I m feeling that there should be someone to whom i can talk discuss my problems, a good frnd ..
.........
a true frnd who is interested in me .. can understand me ......
but havent got any one
on chat i have many frnds and i discuss many things with them just beside chat ..
but i wnt a true frnd that i havent got till now....................

Tuesday, 29 April 2008

call back episodes huhhhhhhhh not again

आज काल TV set (IDIOT BOX) वर बघाव तिकडे वेगवेगळ्या competitions सुरु असतात, त्यात एक नविन फंडा बघायला मिळतो आहे call back episodes.........
मला personally विचाराल तर हे आजिबात पटत नाही, कस ते सांगतो.
म्हणजे बघा पहिले सगळ्यांना बोलवायच priliminary round घ्यायची, त्यातले काही हिरे गाळायचे आणि मग अस करत करत final पर्यंत पोचायच.. ईथपर्यंत ठीक आहे मग call back ची गरज आहे का ? जर तुम्ही marks च्या आधारावर कोण पुढे जाणार हे decide करता मग who got less marks should sent outside. why give second chance .
आणि जर का तुम्हाला खरच वाटत की ते खरच गुणवान आहेत तर मग त्यांना बाहेर का पाठवता You should promote them to next round.
स्पर्धेचे नियम तेवढे flexible हवेत कि तुम्ही decide करु शकाल कि कोण final round पर्यंत जाणार ते

Monday, 14 April 2008

Is there need of reservation to OBCs

In past months there was an issue regarding the OBCs reservation in the higher institutions like IIMs and IITs.
The story behind this was a far long, before many years when there was a group of certain people dominating certain class of people in the society. All the low quality level work were done by these.
The one man Dr Babasaheb Ambedkar came out with a thought to finish this and to help the community. He had done some good things to help the community, the story so far exists some 50 yrs ago when India became independent and every citizen of India awarded equal rights by the republic of India.
If it is there then how come the issue came for the reservation, the republic of India clearly states that each Indian citizen have equal rights compare to the others in the society and the racisism is the major social crime.
Though this is stated, but very few people in the society were aware about it. There is now also some group of persons who want to have their rights just for their sake and not else. so they are trying this reservations weapons to get their people in the higher position without capability.
Here I want to mention the personal experience of mine for the post graduation admission for chemistry, at the time there was also some reservation quota for the SCs STs and NTs. The students who just got just above 45 % had an easy admission to the top most branch in post graduation at one of the major colleges and the students like me, from open quota dont even get a lowest branch at the lowest grade college for approx 66% the list closed at around 66.8 %. This was the terrible experience in my life.
Now back to the point of reservation, the students who dont have capability to learn further just got admission on the reservation quota and just cant complete the studies, many of them leaves in the middle of course, a wastage of few seats that can be helpful for students who really want to study but dont get admission through open quota.
The teaching in the institutions is same for all the class of students, there is not separate batch for the SCs and STs, then where this reservation funda came from. The government takes CET for the courses, that is to test the capability of students, or to check whether he is really a suitable candidate to have that course. Then it should be treated equally for all the students. The ones who will score more will get the admission. This is as straight forward as it is but....
All the things will not happen as we see that it should happen.........
In the society itself, in the daily life experience we dont treat the SCs and STs as a separate part of our life, in the society in the institutions they were treated equally....... so I dont think there is a need to have a separate reservation for some specific community..........

Friday, 4 April 2008

आजही मला ते सर्व आठवतय

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............

Thursday, 20 March 2008

हीच ती अप्सरा…

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

भरऊन्हात चांदणी ही कोठुन आली,
गंध यौवनाचे उधळे ही भोवताली….

हे रुप-वादळाचे नवे रंग कुठले…?
पाखरु मनाचे शोधीती आसरा…..

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

फुलल्या कळीचा हा दर्वळे सुवास
हृदय बावरे का? अधीरलेत श्वास…

हे मुके गीत ओठातुनी कैसे निघाले?
हरविले सुर सारे, भुललो मी अक्षरा…….

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

Thursday, 21 February 2008

PU LA

Thursday, 3 January 2008

1 जानेवारी ची संध्याकाळ

नेहमी प्रमाणे संध्याकाळी मी ऑफिस मधुन घरी जात होतो. लोकल मध्ये जास्त गर्दी नव्हती.
एक भिकारी आणि त्याची बायको भिक मागत होते. खटकण्याची गोष्ट म्हणजे तो भिकारी casio चा पियानो घेउन भिक मागत होता

Friday, 14 December 2007

मला तीला बघायचय................

Image Hosting

Tuesday, 20 November 2007

तू म्हणतेस विसर, पण

तू म्हणतेस विसर, पण



सांग तूला मी विसरू कसा?

पाऊस पडेल हिरवाई होईल

सप्तरंगी फुलांची बरसात होईल

तूझ्या आठवणींचा पाऊस हा असा



सांग तूला मी विसरू कसा?

वैषाख वनव्यात हिरवाई जळेल

तूझ्या आठवणीने हृदय ही पोळेल

तूझ्या विरहाचा वैषाख हा असा



सांग तूला मी विसरू कसा?

गुलाबी थंडीतील बोचरा वारा

डोळ्यांतून वाहतील आसवांच्या धारा

तूझ्या दूरव्याचा गारवा हा असा



सांग तूला मी विसरू कसा?

तू म्हणतेस विसर, पण

सांग तूला मी विसरू कसा?

तुझी आठवण...

प्रचंड सळसळ करू लागते.. तुझी आठवण !
पाचोळ्यागत भरू लागते.. तुझी आठवण !

घरट्याभवती गोळा होती पाखरे तशी
मनभर भिरभिर फिरू लागते.. तुझी आठवण !

सापडल्यावर कवितांची कधि जुनी वही
पुन्हा नव्याने झरू लागते.. तुझी आठवण !

पापणीतल्या पाण्यावरती कधी अचानक
हलते आणिक विरू लागते.. तुझी आठवण !

चालत चालत दूर दूर मी जातो तरिही
उरी खोलवर उरू लागते.. तुझी आठवण !

विसरायास्तव तुला पुस्तके वाचत बसतो,
'अभंग' बनुनी तरू लागते.. तुझी आठवण !

कधी एकट्या सायंकाळी निवांत बसता
अवघे अंतर चिरू लागते.. तुझी आठवण !

मीच ...

मीच दाटेन डोळ्यांत मेघ काळासा होऊन,
मग आसवांचे पूर कसे थोपशील तू ?
मीच असेन नभात चंद्र बिलोर होऊन,
तेव्हा रातभर सखे कशी झोपशील तू ?

सूर माझेच गातील जेव्हा पाखरे रानात,
धून माझ्या बासरीची तुझ्या येईल कानात,
मग अनामिक ओढ जागू लागेल पायांत,
वेड्या पावलांना सखे कशी रोखशील तू ?

दूर जाशीलच किती सांग जाऊन जाऊन,
रोमारोमावर तुझ्या आता माझी स्पर्शखूण,
बघ मिटून पापण्या मीच तिथेही दिसेन,
आता तूच सांग सखे कुठे लपशील तू ?

तुझ्यात मी

मी तुझ्या भवतीच आहे
सळसळतो वाऱ्यातून
मी तुला बघतोच आहे
लुकलुकत्या ताऱ्यांतून!

का कळेना हे तुला मी
या फुलांतून हासतो?
वाहणाऱ्या निर्झरातून
कधीच का ना भासतो?

मी सदाचा गात असतो
मी खगांची शीळ गं
बरसतो तव अंगणातून
मीच तो घननीळ गं!

होशी तू बेधुंद ज्याने
तोच तो मृद्गंध मी
नित्य जे तव ओठी येते
त्या गीताचा छंद मी!

आज वेडे का तरीही
एकटे तुज वाटते?
मी तुझ्या असण्यात असुनी
दुःख हृदयी दाटते?

स्पर्शू दे की कोमल ओठांना

स्पर्शू दे की कोमल ओठांना
दुसरे न काही, हा प्याला असे
देवाकडुनी सुंदर सर्वांहुनी
पुरस्कार मज हा मिळाला असे ।ध्रु।

लाजेने वाया ना जावे
क्षण यौवनाचे रंगीत हे
धडधडत्या अनतंत्र हृदयांतुनी
संदेश प्रीतीचा आला असे ।१।

उडवावे भल्यावर शिंतोडे
ही खोड आहे जगाची जुनी
प्याल्याला ह्या मान सद्भाग्य तू
दुष्कीर्त जरि तो झाला असे ।२।

बायको

अशी आपली बायको असावी - हजार जणींत उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र, त्याची मिजास नसावी

अशी आपली बायको - भक्कम पगाराची,कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र, ती मला घरीच दिसावी

अशी आपली बायको - चतुर, शहाणी,अभिमानी असावी
नम्रपणे माझ्यापुढे मात्र, मान तिची खाली असावी

अशी आपली बायको - सभेत धीट, कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरीदारी मात्र, ती गरीब गाय असावी

अशी आपली बायको - बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र, तिला कधी आठवण नसावी

अशी आपली बायको - प्रसन्न, सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र, तिच्या भाळी आठी नसावी

अशी आपली बायको - शांत गंभीर, पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र, तिची काही प्रतिक्रिया नसावी

अशी आपली बायको - व्यवहारी, काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र, तिची कधी टीका नसावी

अशी आपली बायको - एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र, तिची काही तक्रार नसावी

अशी आपली बायको - सुसंस्कृत माता असावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र, मुलाबाळांवर सावली नसावी

अशी आपली बायको असावी - माझ्यापलिकडे तिची दृष्टी नसावी
मी खिडकीबाहेर बघण्याला मात्र, तिची कधी हरकत नसावी !

प्रेमपत्र पहिले लिहिताना...

प्रेमपत्र पहिले लिहिताना वेळ लागतो
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...

'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...

धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...

उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...

प्रीत!

शांत सारा परिसर
शिरशिर पाण्यावर
कमलीनी झाली दंग
कवेमध्ये घेई भृंग...

काठोकाठ भरे घट
अमृतात न्हाती ओठ
अनावर बाहूपाशी
ओसंडून वाहे काठ...

वारियाच्या तालावर
देठ मंद हले डुले
आत द्वैताची अद्वैती
प्रीत चिरंतन जुळे...

Tuesday, 13 November 2007

एक कविता लिहीन म्हणतो,

एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी..

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके..
चार आण्यांचा फुटला कप,
त्याला बारा आण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट.
त्याला पडताना सावरणारी,
तो चुकला की कावणारी..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी..
एक कविता लिहीन म्हणतो,
शब्दांमध्ये न मावणारी..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं?
जड जायला लागतो रोज ताटातला घास..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास.
परिस्थितीच्या वादळात
जिद्दीचं पीक लावणारी..

"पोलीसी खाक्या"!१

त्या दिवशी गाडीला नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती तरीही मी कसाबसा चढलो. मागून लोक लोटतच होते त्यामुळे थोडा आत आणि सुरक्षित जागी पोचलो. हातात असलेली जड ब्रीफकेस वरती फळीवर ठेवायला दिली आणि व्यवस्थित तोल सांभाळून उभे राहता यावे म्हणून दोन्ही हातांनी वरच्या कड्या पकडल्या. मालाडला चढलो होतो तेव्हा जेवढी गर्दी होती त्यात अंधेरी पर्यंत वाढच होत गेली आणि मग तर श्वास घेणेही मुश्किल होऊन गेले. एकमेकांचे उच्छ्वास झेलत लोक कसे तरी प्रवास करत होते. त्यात काही पंखेही बंद होते. कुणीतरी उत्साही तरूण त्यात कंगवा घालून त्याचे पाते फिरवून पंखा सुरु होतो का असला प्रयत्नही करून पाहात होता.

जलद गाडी (फास्ट ट्रेन) असल्यामुळे अंधेरी-वांद्रे,वांद्रे-दादर आणि दादर-मुंबई सेंट्रल ह्या दरम्यानच्या स्थानकांवर ती थांबणार नव्हती त्यामुळे आता अंधेरीहून गाडी सुटल्यावर तरी निदान पुढचे स्थानक(स्टेशन) येईपर्यंत गर्दी वाढणार नव्हती. भर उन्हाळ्याचे दिवस,त्यात काही पंखे बंद म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना असा प्रकार होता. भरमसाठ गर्दीने आणि उकाड्यामुळे घामाने भिजलेली अंगं,त्यात पाशिंजरांच्या आपापसातील बडबडीमुळे होणारा कलकलाट आणि गाडी वेगात धावत असल्यामुळे होणारा खडखडाट ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही मला झोप येत होती. मी उभ्या उभ्या पेंगायलाही लागलो. एक-दोन वेळा मानही लुढकली पण पुन्हा मी मोठ्या निर्धाराने झोपेचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करू लागलो.

ह्या सगळ्या प्रकारात वांद्रे स्थानक आले केव्हा तेच कळले नाही पण वांद्र्याकडून गाडी जेव्हा माहीमच्या दिशेला निघाली तेव्हा त्या खाडीच्या थंडगार वार्‍याने मी जागा झालो. वांद्र्याला गाडी थोडी रिकामी झाल्याचे जाणवले आणि हात खाली करून कोणताही आधार न घेता उभे राहाता येईल अशी परिस्थिती असल्यामुळे मी कड्या सोडल्या आणि हात खाली केले. हातांचा स्पर्श पँटच्या खिशांना झाला आणि मी ताडकन उडालो. ज्या खिश्यात पास-पाकीट होते तो चक्क सपाट लागत होता. मी खिशात हात घालून पाहिले आणि माझ्या सगळा प्रकार लक्षात आला. माझे पाकीट त्या गर्दीत मारले गेले होते. त्यात नुकताच काढलेला तीन महिन्यांचा रेल्वेचा पास, माझे ऑफीसचे ओळखपत्र आणि काही किरकोळ रक्कम त्यात होती. पास पुन्हा काढता येत होता पण मला चिंता होती ती त्या ओळख पत्राची.कारण मी ज्या केंद्र सरकारी कार्यालयात काम करत होतो ते जरा विचित्र खाते होते. धड ना पोलीस ना नागरी. पोलिसांसारखे आम्ही २४ तास बांधील होतो पण आम्हाला गणवेश नव्हता. पोलीसांसारखे अधिकारही नव्हते पण सेवाशर्ती सगळ्या पोलिसांसारख्या. म्हणजे शिस्तीला एकदम कडक आणि अधिकार काहीच नाही. म्हणजे आमची अवस्था वटवाघळासारखी अधांतरी! ओळखपत्र हरवले म्हणजे आता चौकशीला सामोरे जावे लागणार, कानपिचक्या,दंड आणि रेकॉर्ड खराब होणार. मग आता काय करायचे?तर दादरला उतरून रेल्वे पोलीसात तक्रार करणे इतकेच माझ्या हातात होते.

मी दादरला उतरलो. रेल्वे पोलीस चौकी शोधून काढली आणि माझी तक्रार सांगितली. माझे पाकीट कुठे मारले गेले ? तर अंधेरी ते वांद्रे ह्या दरम्यान. हे त्यांनी माझ्याच तोंडून वदवून घेतले आणि आपले हात वर केले. म्हणाले की ही केस वांद्रे रेपोंची आहे तेव्हा तुम्ही तिथे जा. मग काय मी तसाच वांद्र्याला पोचलो. ह्या सर्व धांदलीत आता आपल्याकडे पास किंवा तिकीट नाही हे देखिल लक्षात आले नाही.पण सुदैवाने कुणी अडवले नाही. वांद्र्याच्या त्या पोचौ मध्ये मी पोचलो तेव्हा तिथे दोन पोलीस बसले होते. दोघे आमने सामने बसले होते. त्यातला एक जमादार(एक तारा) फोनवर कुणाशी तरी गप्पा मारत होता आणि दुसरा हवालदार त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसून अगदी मन लावून कान कोरत होता. माझ्या तिथल्या आगमनाची जरादेखिल जाणीव त्यांना झाल्याचे दिसले नाही. मी आपला त्यांचे माझ्याकडे कधी लक्ष जाते ह्याची वाट पाहात चुळबुळ करत उभा होतो पण रामा शिवा गोविंदा. दोघेही आपल्याच तारेत होते. शेवटी एकदाचे त्या जमादाराचे फोनवरचे बोलणे संपले आणि आता तो आपल्याकडे नक्की पाहील आणि विचारेल... वगैरे वगैरे विचार मी केला पण पुढे काहीच घडले नाही. त्या जमादाराने हवालदाराशी बोलणे सुरु केले.
"बरं का वाघमार्‍या,तिच्या आयला........ ह्या मा**** साहेबाच्या ***बांबू सारला पाहिजे. फुकटचोट भे** तरास देतोय."
"सायेब.तुमाला काय सांगू? ते म्हनजे बगा एकदम बारा बोड्याचं बेनं हाय.लय मा**** बगा.त्येच्या फुडं नुस्तं हांजी हांजी म्हनायचं. अवो धा वर्सं काडलीत त्येच्या संगट.लई हरामी जात हाय. तुमी त्येच्या नादी लागू नका.... वगैरे वगैरे वगैरे"!
त्यांचे ते बोलणे असे सुरुच राहिले असते म्हणून त्यात व्यत्यय आणण्यासाठी मी जोरात खाकरलो आणि मग नाईलाजाने त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी लागली.

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express