आज खूप लिहावसं वाटतय मझ्या प्रेमाबद्दल,
मी शाळेत असतानापासून एका मुलीच्या प्रेमात होतो. ती आमच्या शेजारीच यायची, म्हणजे तिची मामी आमच्या शेजारी राहायची. लहानपणीच आम्ही एकत्र खेळायचो. एकत्र खेळताना तिच्या बद्दल आणखी महिती कळायला लागली तेव्हा पासून मला तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. मी जराही वेळ न घालवता तिला सांगितलं. भले मझ्या सांगण्याची पद्धत चूकली असेल पण मझ्या भावना तर बदलत नहित ना.
तिने अपेक्षीत उत्तर दिलं की आपण तर एकमेकांना चांगलं ओलखत पण नही तर तु असा विचार कसा करू शकतोस. अता मला अस वाटत नही की प्रेमात पडायला ओळखीची गरज असते ते. मी काय वेडा म्हणून तिला हे सगळं सांगत नव्ह्तो. पण जाउदे तिचं पण बरोबर असेल. नंतर बरेच दिवस गेले, आमच आयुष्य असच चाललं होतं. मी माझ्या भावना माझ्या मनातच ठेवल्या.
तीला माझ्या बद्दल कहीच वाटत नही हे सुद्धा मला मान्य आहे. पण एवढीच इच्छा आहे की तिनी पण माझ्या भावना समजून घेतल्या पहिजेत. मी तिला असं कधीच म्हंटल नव्हत की तु आख्ख आयुष्य माझ्या बरोबर घालव. मझं फक्त एवढच म्हणन आहे की तिनी मझ्याशी बोलावं ती आनंदी राहिल त्यातच माझं सूख आहे. एवढी वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखत आहोत पण अजुनही तिला माझ्या भावना समजल्या नाहीत. मध्यंतरी माझ्या कडून काही चूका झाल्या असतील पण म्हणून माझ प्रेम कधिच कमी झालं नाही.
आता मला सगळं विसरायचय परत नविन सुरुवात करायची आहे.
मझ्या एका मैत्रिणीने सांगितल आहे कि जो माणुस भुतकाळात असतो त्याला भविष्यकाळ नसतो.
No comments:
Post a Comment