Monday 8 January, 2007

काहीच कळत नाही

बोलावं वाटतं खूप पण... जीभच वळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मन झालंय वादळवारं.. तूफान मनात दाटलंय सारं


आवेगाचा पाऊस जसा... कोसळत जातो धुवाधार

बरसावं वाटतं तसंच पण... शब्दच फळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

स्वतःशीच हसणं होतं... स्वतःशीच बोलणं होतं

कुणी काही म्हटलं तरी... मन मुकं मुकं होतं

ज्यांच्यावाचून नव्हतं करमत.. त्यांच्याशीही जुळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

तुझीच आस, तुझीच ओढ... काहीच नाही वाटत

गोडकानी गुंजते तुझीच शीळ... जीव तुटतो तीळ तीळ

छळायचा जो एकांत आता.. तो ही छळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मुकी मुकी जरी वाणी... मनी मात्र फुलती गाणी

आटपाट नामे नगरीचा.. तू राजा, मी राणी

सारं तसं खोटं खोटंच... पण मनास वळत नाही

काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express